Notes For All Chapters – इतिहास Class 12
भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
1. निर्वसाहतीकरण ते एकीकरण
निर्वसाहतीकरण म्हणजे काय?
वसाहतवाद्यांनी त्यांच्या वसाहतींमधील सत्ता स्थानिक लोकांकडे हस्तांतरित करणे म्हणजे निर्वसाहतीकरण.
याचे तीन टप्पे –
- वसाहतवादाला विरोध
 - स्वातंत्र्यलढा
 - वसाहतींना मिळालेले स्वातंत्र्य
 
भारतातील संस्थानांचे विलीनीकरण:
- भारत स्वतंत्र झाल्यावर ६००+ संस्थाने होती.
 - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुत्सद्देगिरीमुळे अनेक संस्थानांचे भारतात विलीनीकरण झाले.
 - त्यांनी संस्थानिकांना ‘सामीलनामा’ स्वीकारायला भाग पाडले.
 
2. जुनागढ, हैदराबाद व काश्मीर
जुनागढ
- गुजरातमधील संस्थान
 - नवाब पाकिस्तानच्या बाजूने, पण प्रजा भारताच्या बाजूने
 - नवाब पळून गेला, फेब्रुवारी १९४८ ला भारतात विलीनीकरण
 
हैदराबाद
- भारतातील सर्वात मोठं संस्थान
 - निजामने भारतात यायचे नाकारले
 - लोकशाहीवादी चळवळींचा जोरदार विरोध
 - कासीम रझवीने रझाकार संघटना स्थापन केली
 - भारत सरकारने ऑपरेशन पोलो अंतर्गत लष्कर पाठवले
 - १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद भारतात विलीन
 
महत्त्वाची नावे:
- स्वामी रामानंद तीर्थ – नेतृत्व
 - गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, फुलचंद गांधी, देवीसिंग चौहान – सहभाग
 - १७ सप्टेंबर – मराठवाडा मुक्तीदिन म्हणून साजरा
 
काश्मीर
- राजा हरिसिंगने सुरुवातीला भारत वा पाकिस्तान दोघात न जाण्याचा निर्णय घेतला
 - पाकिस्तानने आक्रमण केल्यावर भारताकडे मदत मागितली
 - २७ ऑक्टोबर १९४७ – सामीलनामा भारताला दिला
 - काश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे गेला
 - संयुक्त राष्ट्रसंघात वाद
 - कलम ३७० अन्वये विशेष दर्जा
 
3. दादरा व नगर-हवेली
- पोर्तुगीजांचा अंमल
 - १९५४ मध्ये ‘युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स’ व ‘आझाद गोमंतक दल’ यांनी चळवळ सुरू केली
 - फ्रान्सिस मस्कारन्हीस, विमल सरदेसाई यांचे नेतृत्व
 - पोर्तुगीज कॅप्टन फिडाल्गो शरण आला
 - २ ऑगस्ट १९५४ – भारतात अधिकृत विलीनीकरण
 
4. गोवा
- पोर्तुगीजांचा सत्ताकाल – ४५० वर्षे
 - १९२८ – गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना
 - डॉ. टी.बी. कुन्हा – प्रमुख
 - १९४६ – डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली कायदेभंग
 - मोहन रानडे – सशस्त्र चळवळीचे नेतृत्व
 - ऑपरेशन विजय अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा भारतात सामील
 
महत्त्वाची नावे:
- सेनापती बापट, विश्वनाथ लवंदे, सुधीर फडके
 - जयंतराव टिळक, नानासाहेब काजरेकर, पीटर अल्वारिस
 
5. पुदुच्चेरी (पाँडिचेरी)
- पुदुच्चेरी, कारिकल, माहे, यानम आणि चंद्रनगर हे फ्रेंचांच्या ताब्यात होते
 - कामगार नेता व्ही. सुबय्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
 - १९५४ – पुदुच्चेरीचा ताबा भारताला मिळाला
 - १९६२ – फ्रेंच संसदेची मान्यता
 - १९६३ – पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश झाला
 

Leave a Reply