Question Answers For All Chapters – नागरिकशास्त्र Class 7
आपल्या संविधानाची ओळख – Solutions
स्वाध्याय
१. पुढील संकल्पना स्पष्ट करा:
(१) संविधानातील तरतुदी :
उत्तर: संविधानामध्ये नागरिकांचे हक्क, कर्तव्ये, शासनाची जबाबदारी आणि कायदे निश्चित केले जातात. यामध्ये लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांचा समावेश असतो.
(२) संविधान दिन :
उत्तर: भारतीय संविधानाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो.
२. चर्चा करा:
(१) संविधान समितीची स्थापना केली गेली :
उत्तर: भारतीय संविधान तयार करण्यासाठी ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
(२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात :
उत्तर: डॉ. आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास करून भारतीय संविधान तयार केले. त्यांचे योगदान मोठे असल्याने त्यांना “भारतीय संविधानाचे शिल्पकार” म्हणतात.
(३) देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी :
उत्तर:
- कायदे व नियम बनवणे
- न्यायव्यवस्था व सुरक्षा यंत्रणा
- शिक्षण, आरोग्य व रोजगार
- राष्ट्रीय सुरक्षा व सीमांचे संरक्षण
- गरिबांसाठी विविध योजना
३. योग्य पर्याय निवडा:
(१) कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही?
उत्तर: (क) इंग्लंड
(२) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: (ब) डॉ. राजेंद्रप्रसाद
(३) खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?
उत्तर: (अ) महात्मा गांधी
(४) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: (क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४. तुमचे मत लिहा:
(१) शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात?
उत्तर: शासनाला शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला व बालविकास, औद्योगिक प्रगती, पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी विषयांवर कायदे करावे लागतात.
(२) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?
उत्तर: २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले. यामुळे भारत प्रजासत्ताक बनला, म्हणजेच लोकशाही पद्धतीने चालणारा देश. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
(३) संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे :
उत्तर:
- शासनाची उत्तरदायित्व ठरते.
- नागरी हक्क व स्वातंत्र्य संरक्षित राहते.
- कायद्याचे राज्य प्रस्थापित होते.
- लोकशाही मजबूत होते.
- समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळते.

This helped me very much thanks you so much guys who made this