Question Answers For All Chapters – इतिहास Class 8
ब्रिटिश सत्तेचे परिणाम – Solutions
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(1) पोर्तुगीज, ……….. , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.
(अ) ऑस्ट्रियन (ब) डच
(क) जर्मन (ड) स्वीडीश
उत्तर – (ब) डच
(2) 1802 मध्ये ……… पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
(अ) थोरले बाजीराव (ब) सवाई माधवराव
(क) पेशवे नानासाहेब (ड) दुसरा बाजीराव
उत्तर – (ड) दुसरा बाजीराव
(3) जमशेदजी टाटा यांनी ……….. येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
(अ) मुंबई (ब) कोलकाता
(क) जमशेदपूर (ड) दिल्ली
उत्तर – (क) जमशेदपूर
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मुलकी नोकरशाही:इंग्रजांच्या प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक. लॉर्ड कॉर्नवालिसने भारतात ही प्रणाली सुरू केली. महसूल गोळा करणे, न्यायदान, कायदा आणि सुव्यवस्था राखणे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. नोकरशाहीतील अधिकाऱ्यांची निवड स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.
(२) शेतीचे व्यापारीकरण:इंग्रज सरकारने भारतीय शेतकऱ्यांना नगदी पिके (कापूस, तंबाखू, नीळ, चहा) घेण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे अन्नधान्य उत्पादनावर परिणाम झाला आणि शेतकरी बाजारपेठेवर अवलंबून राहू लागले.
(३) इंग्रजांची आर्थिक धोरणे:इंग्रजांनी भारतात भांडवलशाही अर्थव्यवस्था रुजवली. त्यांनी महसूल संकलन, व्यापारवृद्धी, नवीन उद्योग, आणि ब्रिटिश मालाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणे अवलंबली. यामुळे भारतीय शेतकरी, कारागीर आणि स्थानिक उद्योगांचे मोठे नुकसान झाले.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.
उत्तर –
- इंग्रजांनी शेतसारा रोख स्वरूपात आणि ठरावीक वेळेत भरायची सक्ती केली.
- उत्पन्न कमी झाल्यास शेतकरी सावकारांकडून कर्ज घ्यायला भाग पडत.
- कर्जफेड न झाल्यास शेतकऱ्यांना आपली जमीन गमवावी लागे.
(२) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.
उत्तर –
- इंग्रजांनी भारतीय हातमाग उत्पादनांवर जादा कर लावले, तर इंग्लंडच्या मालावर कमी कर ठेवला.
- यंत्रनिर्मित स्वस्त ब्रिटिश कापडाच्या स्पर्धेत भारतीय वस्त्रोद्योग टिकू शकला नाही.
- अनेक भारतीय कारागीर बेकार झाले आणि पारंपरिक उद्योगधंदे नष्ट झाले.
Shrutika Shingade says
these answers is good for learning and writing